१. शेतकरी व सहकार
योग्य भाव, सिंचन, पीक विमा, सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि ग्रामीण रोजगार हे केंद्रीय प्राधान्य राहील.
२. युवक व रोजगार
कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता, योजनांची माहिती आणि स्थानिक संधी याद्वारे तरुण पिढीला सन्मानाची वाटचाल.
३. शिक्षण व आरोग्य
शाळा-महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, पोषण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करणे.
४. महिला सक्षमीकरण
सुरक्षा, आर्थिक स्वावलंबन आणि समित्या / निर्णयप्रक्रियेत समान प्रतिनिधित्व.
५. सामाजिक न्याय
संविधानिक हक्क, आरक्षण, समावेश आणि दुर्बल घटकांचे संरक्षण अबाधित ठेवणे.
६. स्थानिक स्वराज्य
ग्रामपंचायत, नगरपरिषद व जिल्हा परिषद स्तरावर विकेंद्रीत विकास व जनसहभाग.
७. संघटनात्मक वचन
निवडणुकीपुरते मर्यादित न राहता — बूथ ते प्रदेश वर्षभर संपर्क, प्रशिक्षण आणि जबाबदार नेतृत्व. तुतारी चिन्हावर जनतेचा विश्वास टिकवणे हे आमचे काम आहे.